‘नर्मदा परिक्रमा करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे कुठेही नर्मदा मैय्याला ओलांडण्याचे नाही’, ‘परिक्रमा करताना आपल्याला कधी राजयोग, तर कधी भिकारी योग, कधी जेवायला पंचपक्वान्न, तर कधी नुसतीच बिस्किटे’, ‘दगड- धोंड्यातून वाटचाल करत पुढे आलो, तर एका शेतात एक आदिवासी शेताला पाणी देत होता.’ ‘आज सकाळी लवकर उठलो. कारण आता अमरकंटक फ्फाक्त २० किलोमीटर राहिले होते.’ ‘डोळ्यांतून अश्रुधारा व्हायला लागल्या,’ सदानंद येरवडेकर यांच्या लेखनातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो.
ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, यात्रेदरम्यान येणारे अनुभव, संकटे आणि समाधान या सर्वांची वृत्तांत ते सांगतात. परिक्रमा मार्ग, नद्यांचे संगम, तीर्थमहिमा या माहितीसह भरपूर छायाचित्रे हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : १४४
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)